Search This Blog

Thursday, May 31, 2018

ना. पांडुरंग फुंडकर यांचे निधन.....

राज्याचे कृषीमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर याचं आज पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते. मुंबईतील सोमय्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत. फुुंडकर यांच्या पार्थिवावर खामगाव येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. थोेड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही मंत्री रुग्णालयात त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेणार आहेत. फुंडकर यांच्या पार्थिवावर आज खामगाव येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. श्वसनाचा त्रास जाणवत असल्याने त्यांना बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पहाटे हृदयविकाराचा झटका आल्याने फुंडकर यांचं निधन झाले. पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे शेती प्रश्नाची जाण असलेला नेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
पांडुरंग फुंडकर यांनी सलग तीन वेळेस अकोला लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. १९८९ मध्ये पहिल्यांदा त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. वर्ष १९९१ ते १९९६ यादरम्यानच्या काळात त्यांनी भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी पार पाडली होती. महाराष्ट्र विधानसभेवर १९७८ आणि १९८० साली निवडून गेले होते. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात २०१६ मध्ये फुंडकर यांच्या समावेश करण्यात आला. राज्यात भाजपा वाढवण्यासाठी फुंडकर यांनी गोपीनाथ मुंडे ,आ. एकनाथ खडसे यांच्यासह मोठे प्रयत्न केले. भाजपाला ग्रामीण भागाता जनाधार मिळवून देण्यात फुंडकर यांचा मोठा वाटा राहिला आहे. 

Wednesday, May 30, 2018

हरियाणाच्या या गावात अजूनही तिरंगा फडकावला जात नाही

29 मे 1857चा तो दिवस हरियाणाच्या रोहनात गावासाठी खूपच भीषण होता. ईस्ट इंडिया कंपनीच्या घोडेस्वार सैनिकांनी सूड उगवण्यासाठी पूर्ण गाव बेचिराख केलं होतं. पण का?
याचा संबंध आहे 1857च्या लष्करी उठावाशी, ज्याला 'स्वातंत्र्याचं पहिलं युद्ध'ही म्हटलं जातं. हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील हांसी शहरापासून काही अंतरावर रोहनात गाव आहे. या गावातल्या लोकांनी केलेल्या जाळपोळीच्या भीतीने ब्रिटिश अधिकाऱ्यांनी गावातून जीव वाचवून पळ काढला होता.
पण गावकऱ्यांनी त्यांचा पाठलाग करत त्यांना ठार केलं होतं. त्याच बरोबर हिसारचा तुरुंग तोडून कैद्यांना सोडवण्याचा पराक्रम केला.
याच्या प्रत्युत्तरात ब्रिटिश फौजांनी 29 मे 1857 रोजी याच गावात सामूहिक नरसंहार केला.
प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ के. सी. यादव या भयावह घटनेचं वर्णन करतात - "तळपत्या उन्हात रोहनातच्या राहिवाशांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांचा निर्घृणपणे खून केला होता. म्हणूनच ब्रिटिश सैनिकांनी सूड घेण्यासाठी गावकऱ्यांना निर्घृणपणे मारण्यात आलं. अनेक लोकांना तोफेच्या तोंडी दिलं. काही लोकांना झाडाला टांगून फाशी दिली." आणि ब्रिटिश इथेच थांबले नाही.
"ब्रिटिशांनी ज्या बंडखोरांना पकडलं त्यांना रोड रोलरखाली चिरडलं. ज्या रस्त्यावर हे घडलं त्याला 'लाल सडक' असं नाव ठेवलं!"
पूर्ण प्रकरण काय आहे?
गावातल्या लोकांचा सूड घेण्यासाठी ब्रिटिश सैन्याच्या तुकडीने रोहनात गाव बेचिराख केलं. यानंतर बंडखोरीच्या शंकेने त्यांनी गावातल्या निर्दोष लोकांची धरपकड सुरू केली.
गावकऱ्यांना अगदी प्यायला पाणी मिळू नये म्हणून त्यांनी विहिरीचं तोंड मातीने झाकलं आणि लोकांना फासावर लटकवलं.
या घटनेनंतर अनेक महिने तिथे कोणीही नजरेस पडलं नाही.
घटना इतकी भयावह होती की आज दीडशे वर्षांनंतरही गावकऱ्यांच्या मनात याची दहशत आहे. आम्ही रोहनातचे माजी सरपंच 82 वर्षांचे चौधरी अमी सिंह बोरा यांना भेटलो, ज्यांचे पणजोबा दया राम यांनाही 29 मे 1857 रोजी झाडावर फाशी देण्यात आली होती. ते सांगतात, "आज या झाडाला त्या नरसंहाराचा साक्षीदार मानलं जातं. पण ते आमच्यासाठी फार पवित्रही आहे."
स्वातंत्र्यानंतरही संघर्ष कायम
अमी सिंह यांनी 1857च्या कहाण्या आपल्या आजोबांकडून ऐकल्या होत्या. या घटनेची आठवण होताच ते भावूक होतात.
"हांसी आणि त्याच्या आसपास सगळं शांत झाल्यावरसुद्धा सूडाची कारवाई सुरूच राहिली. रोहनातच्या सगळ्या शेतजमिनीचा बाहेरच्या लोकांसाठी लिलाव झाला, जेणेकरून मूळ दावेदारांना त्यांचा हक्क मिळणार नाही," ते सांगतात.
ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढा देणाऱ्यांमध्ये रोहनात गावातील स्वामी बृहद दास वैरागी, रूपा खत्री आणि नौन्दा जाट होते.
1947 साली भारत स्वातंत्र्याचा आनंद साजरा करत होता, पण या गावात आनंदी होण्यासाठी काहीही नव्हतं.
प्रोफेसर यादव यांनी आपलं पुस्तक 'रोल ऑफ ऑनर हरियाणा मार्टर 1857'चं वर्णन केलं आहे. त्यात ज्यांची जमीन जप्त झाली आहे अशा 52 जमीनदार, 17 बागायतदारांचा उल्लेख केला. नोव्हेंबर 1858 मध्ये लिलावात विकण्यात आलं होतं, असं ते लिहितात.
अमी सिंह सांगतात, "महसूल खात्याच्या नोंदीनुसार 20,656 एकर जमीन जप्त केली. त्यात उमरा, सुल्तानपूर, दंधेरी आणि मजादपूर या भागात 61 लोकांनी 81,00 रुपयात खरेदी केली होती. आजच्या किमतीपेक्षा हे फारच कमी आहे."
दु:खी अंत:करणाने ते पुढे सांगतात, "जेव्हा आमचे पूर्वज आले तेव्हा त्यांना पळपुट्या लोकांसारखी वागणूक दिली. त्यांच्याकडून त्याच शेतांमध्ये मजूर म्हणून काम करवून घेण्यात आलं जी कधीकाळी त्यांच्याच मालकीची होती."  याच गावात आम्हाला 65 वर्षांचे सतबीर सिंह भेटले, ज्यांच्याकडे आज 11 एकर शेतजमीन आहे. ते म्हणाले की त्यांच्या पूर्वजांनी कष्ट करून गावातली 65 टक्के जमीन पुन्हा खरेदी केली आहे. त्यासाठी त्यांना मोठी किंमत मोजावी लागली.
गावचे सध्याचे सरपंच रविंदर कुमार बोरा सांगतात की हे गाव हरियाणाच्या अन्य गावांसारखंच आहे, जिथे विकासाचा निधी मिळवणं तितकंच कठीण होतं. त्यांनी गावातील जमीन वारसदारांना देण्यासाठी बराच संघर्ष केला होता. पण त्यांना यश आलं नाही.
"आम्ही अजूनही आमच्या पूर्वजांच्या त्या लढ्याला एक ओळख मिळावी म्हणून संघर्ष करतो आहे," असंही ते पुढे म्हणाले.
हे प्रकरण आधी पंजाब आणि हरियाणा सरकारांपुढे आलं होतं. हरियाणा सरकारने असं स्पष्टही केलं होतं की या जमिनी त्यांच्या सध्याच्या मालकांकडून परत घेतल्या गेल्या पाहिजे.
पण हे प्रकरण काही सुटलं नाही.
आजही इथले गावकरी शेतीसाठी जमीन आणि नुकसानभरपाईची मागणी करत आहेत. काही वर्षांपूर्वी थोडीफार नुकसान भरपाईची घोषणा करण्यात आली होती, पण तीही आतापर्यंत मिळालेली नाही.
आणि सात दशकं उलटूनही गावातल्या लोकांच्या मागण्या मान्य झाल्या नाही आहेत.
बारगळलेला प्रश्न
इतिहासकार रणवीर सिंह फोगाट सांगतात की त्यांनी काही वर्षांपूर्वी रोहनातच्या आजूबाजूच्या गावांचा दौरा केला आणि हांसीच्या ज्येष्ठ लोकांशी चर्चा करून 1857च्या भयावह कहाण्या गोळा केल्या.
त्यांच्या मते योग्य नुकसानभरपाई देण्याच्या मुद्द्याकडेच दुर्लक्ष करण्यात आलं आहे. हा मुद्दा आता हरियाणा विधानसभेत एक अध्यादेश जाहीर करूनच सोडवला जाऊ शकतो, असंही त्यांना वाटतं.
लष्करात काम केलेल्या चौधरी भाले राम यांनी नरवाना गावात खटला दाखल केला आहे. या गावातल्या ज्येष्ठांना स्वातंत्र्य सैनिकांइतकी पेन्शन मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सतबीर सिंह सांगतात की जेव्हा 1957 मध्ये प्रताप सिंह कैरौ मुख्यमंत्री होते, तेव्हा 1857च्या उठावाचा शंभरावा स्मृतिदिन साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावेळी रोहनातच्या जमिनीच्या बदल्यात जंगलाची जमीन द्यावी, असा प्रस्ताव पारित झाला होता.
रोहनात शहीद कमिटीने 15 नोव्हेंबर 1971 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींची भेटही घेतली होती. त्यांनी या प्रकरणावर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं होतं. पण अजूनही हे प्रकरण प्रलंबित आहे.
माजी मुख्यमंत्री बन्सी लालसुद्धा शेजारच्या भिवाणीमधून होते. तेसुद्धा या प्रकरणाचा तोडगा काढू शकले नाही.
इतिहासकार यादव यांना वाटतं की जप्त केलेली जमीन दुप्पट नुकसानभरपाईच्या रूपात दिली जावी आणि सरकारी नोकरीत या वारसदारांना प्राधान्य दिलं जावं.
..तोवर तिरंगा फडकणार नाही!'
यावर्षी 23 मार्चला हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी रोहनात गावात राष्ट्रध्वज फडकावण्यासाठी पोहोचले. त्यांनी पीडितांना योग्य नुकसानभरपाई देण्याचं आश्वासन दिलं.
Image copyrightHULTON ARCHIVE/GETTY IMAGES
पण सरपंच बोरा यांनी आपला आणि गावकऱ्यांचा निश्चय ठामपणे मांडला - जोवर आश्वासनांची पूर्तता होत नाही, तोवर गावात राष्ट्रध्वज फडकणार नाही.
5,000 लोकसंख्या असलेल्या रोहनात गावातल्या लोकांमध्ये आजही रोष आहे. त्यांना दु:ख आहे की त्यांच्या पूर्वजांना मान दिला जात नाही, योग्य नुकसानभरपाई दिली जात नाही. म्हणून ते तिरंगा फडकावत नाही.
गावातले सरपंच रवींद्र बोरा यांच्यामते, "गावातले लोक नक्कीच राष्ट्रीय उत्सवात भाग घेतात. पण जोपर्यंत या गावाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत इथे तिरंगा फडकावला जाणार नाही."

Monday, May 28, 2018

विनायक दामोदर सावरकर

लंडनमधे एक चौकात सावरकरांचा अर्धकृति पुतळा आहे. हा तिथे बसवू नये म्हणून Conservative पक्षाने संसदेत वाद घातला होता, पण सरकारने सांगितले. “इंग्लंडच्या सर्व शत्रुंमधे जे सर्वश्रेष्ठ आहेत,सावरकर हे त्यातील एक आहेत,इंग्लंड हे भाग्यवान राष्ट्र आहे,त्याला सावरकर यांच्या सारखा चारित्र्य संपन्न,प्रखर राष्ट्रभक्त आणि कमालीचा बुद्धिमान शत्रु मिळाला.”
सावरकर…. एकमेवाद्वितीय…..
१) हिंदुस्तानला संपूर्ण स्वातंत्र्य हवे अशी मागणी करणारे हे पहिलेच पुढारी. सन १९०० मध्ये त्यांनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली होती..
२) १८५७ च्या बंडास “सातंत्र्ययुद्ध” म्हणून गौरवणारे पहिलेच इतिहास संशोधक.
३) १८५७ च्या समरानंतर हिंदुस्तानातील जनतेला शमवण्यासाठी व्हिक्टोरिया राणीने काढलेल्या पत्रकास, “मॅग्ना कार्टा” ला “एक भिकार चिरोटे” म्हणून झिडकारणारे सावरकर पहिलेच, १९०० साली म्हणजे वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी..
४) देशभक्ती केली म्हणून ज्यांची बी.ए. ची पदवी काढून घेतली असे पहिले विद्यार्थी…
५) परदेशी मालाची होळी करणारे सावरकर हे पहिलेच पुढारी, सन १९०५ मध्येच त्यांनी परदेशी मालावर बहिष्कार व स्वदेशीचा पुरस्कार करण्याचा संदेश दिला, मात्र कॉंग्रेसच्या गांधींनी १९२१ साली सावरकरांचे हेच तत्व तंतोतंत उचलले आणि लोकप्रिय झाले.
६) परदेशी मालाच्या होळीमुळे देशभक्तीच्या कारणास्तव वसतीगृहातून काढून टाकलेले सावरकर हे पहिलेच विद्यार्थी…..
७) मे,१९०९ मध्ये बॅरिस्टर होऊनही सनद दिली नाही असे सावरकर हे पहिलेच विद्यार्थी…
८) शत्रूच्या राजधानीत जाऊन (लंडन) त्यांच्या विरोधात युद्ध पुकारण्याची हिंमत ठेवणारे सावरकर हे पहिलेच…
९) शत्रूच्या ताब्यातून (मार्सेलिस बंदर) धाडसाने सागरात उडी मारून निसटण्याचा प्रयत्न केलेले सावरकर हे पहिलेच क्रांतीकारी…
१०) प्रसिद्धीपूर्वीच ज्यांचे ग्रंथ जप्त करण्यात आले असे पहिलेच क्रांतीकारक…
११) शत्रूच्या राजधानीत जाऊन लंडनमधील १८५७ च्या स्वातंत्र्यसमराचा सुवर्णमहोत्सव साजरा करणारे सावरकर हे पहिलेच क्रांतीकारी…
१२) शिखांचा इतिहास लिहिणारे पहिले लेखक हे सावरकरच….
१३) स्वातंत्र्यलढ्याकडे जगाचे लक्ष वेधून घेण्याचा पराक्रम करणारे सावरकर हेच पहिले…
१४) भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी सर्व देशातील क्रांतीकारकांची संघटना उभारणारे सावरकर हेच पहिले… त्यासाठी तुर्की,रशियन,आयरिश,इजिप्शियन,फ़्रेंच इ. क्रांतीकारकांशी संपर्क केला होता…
१५) विसाव्या शतकात २ जन्मठेपींची शिक्षा सुनावण्यात आलेले सावरकर हे एकमेव आणि फ़क्त सावरकरच…
१६) अंदमानच्या कारावासात भिंतींवर काट्याने आणि खिळ्याने महाकाव्य रचणारे महाकवी एकमेव सावरकर…. तसेच सुमारे ६००० पंक्ती कोठडीत लिहिल्या,मुखोद्गत करून बाहेर आल्यावर प्रकाशित करण्याचा महापराक्रम करणारे एकमेव असे सावरकर…
१७) बालपणी वहीनी व बहिणीसोबत ओव्यांच्या भेंड्या खेळताना त्यात नवनवीन ओव्या रचून त्यात स्वातंत्र्याची प्रेरणा गुंफू पहाणारे सावरकर हेच एकमेवाद्वीतीय…
१८) तुरुंगात असताना मराठी व्याकरणातील वृत्ते आठवत नाहीत म्हणून नवी वृत्ते रचून मराठी भाषेच्या व्याकरणात भर घालणारे सावरकर हेच एकमेव… व्याकरणात त्या व्रूत्तांना “वैनायक” म्हणून ओळखले जाते.
१९) अस्पृष्यांना रत्नागिरीत विट्ठल मंदीरात प्रवेश मिळवून देणारे सावरकर हेच पहिले.
२०) एका अस्पृश्याने शंकराचार्यांच्या गळ्यात हार घालण्याची घटना घडविणारे सावरकर हेच पहिले…
२१) अस्पृश्य लोक स्पर्श करू शकतील असे मंदीर स्वखर्चाने बांधवून घेणारे पहिले सावरकरच.. कै. श्री. भागोजी कीर यांनी सावरकरांच्याच प्रेरणेतून रत्नागिरीत “पतितपावन” मंदीर बांधले.
२२) भाषाशुद्धीचे महत्व सांगणारे सावरकरच..
२३) सगळे सुशिक्षित लोक इंग्रजीला वाघिणीचे दूध म्हणून गौरवीत असतना, मात्रूभाषा व राष्ट्रभाषेचा अभिमान देशात जागवणारे फ़क्त सावरकरच पहिले…
२४) प्रत्यक्ष साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून, “लेखण्या सोडा, बंदुका हाती घ्या” असा दिव्य दाहक संदेश देणारे पहिले साहित्यिक सावरकरच…
२५) शास्त्रशुद्ध अभ्यास करून देवनागरी लिपी टंकलेखनास (टायपिंगसाठी) सुयोग्य बनवणारे सावरकरच…. लिपीमध्ये सुधारणा करणारा जगातील एकमेव नेता आणि लोकोत्तर पुरूष म्हणजे फ़क्त सावरकरच……