आ. एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्यामुळेच शासनाचा महत्त्वाचा निर्णय
आता या पुढे जातीचा दाखला काढण्यासाठी घरातील रक्त संबंधातील कोणाचेही एकाचे जात वैधता प्रमाणपत्र असल्यास इतर पुराव्यांची आवश्यकता राहणार नाही. या संबंधी २४नोव्हेंबर२०१७ रोजी शासनाने महत्वपुर्ण निर्णय घेत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे आ. एकनाथराव खडसे यांनी याबाबत वेळोवेळी विधानसभेत सरकारविरोधी आक्रमक होत जातप्रमाणपत्रासाठी रक्ताच्या नात्त्यातीला एकाचे जरी जातप्रमाणपत्र असेल तर दुसरे कोणतेही प्रमाणपत्र घेवु नये, असे विधान केले होते अखेर सरकारने विधेयक करुन तसा निर्णय २४नोव्हेंबर२०१७ रोजी प्रसिध्द केला आहे.Search This Blog
Showing posts with label #BJP. Show all posts
Showing posts with label #BJP. Show all posts
Friday, November 24, 2017
Tuesday, November 14, 2017
कमी दराचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवा- ना. सुधीर मुनगंटीवार
वस्तू आणि सेवा कर प्रणालीत हॉटेल आणि रेस्टॉरंटवरील कर दर ५ टक्के इतका कमी करण्यात आला असून याबद्दलची अधिसूचना निर्गमित होताच या कमी कर दराचा लाभ सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन वित्तमंत्री सुधीर मनुगंटीवार यांनी केले. आज सह्याद्री अतिथीगृहात हॉटेल ॲण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ( वेस्टर्न इंडिया) च्या प्रतिनिधींनी वित्तमंत्री श्री. मुनगंटीवार यांची भेट घेऊन कर दर कमी केल्याबद्दल आभार व्यक्त केले त्यावेळी ते बोलत होते.
राज्यात वस्तू आणि सेवा कर प्रणालीची अंमलबजावणी करताना शासनाने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली असल्याचे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले, हॉटेल आणि रेस्टॉरंटवरील कर दर कमी झाल्याची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात यावी. जे हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिक वस्तू आणि सेवा कर प्रणालीअंतर्गत रजिस्टर नाहीत त्यांना नोंदणीकृत करण्यासाठी असोसिएशनने पुढाकार घ्यावा यासाठी चर्चासत्रे, मेळावे घेण्यात यावेत. ज्या हॉटेल व्यावसायिकांनी वस्तू आणि सेवा कर प्रणालीअंतर्गत नोंदणी केली आहे त्यांनी त्यांचा जीएसटी नंबर हॉटेलमध्ये दर्शनी भागावर डिस्प्ले करावा. तशी कायद्यात तरतूद आहे असेही ते म्हणाले.
वस्तू आणि सेवा कर प्रणालीचे करजाळे वाढवताना जे छोटे व्यावसायिक कर जाळ्यात येऊ इच्छितात त्यांना त्यांचे परतावा दाखल करण्यासाठी वस्तू आणि सेवा कर विभाग मदत करील तसेच त्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण ही देईल, अशी माहिती वस्तू आणि सेवा कर आयुक्त राजीव जलोटा यांनी यावेळी दिली.
हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांना कमी करदराचा लाभ देताना इनपूट टॅक्स क्रेडिट सिस्टीम पूर्ववत ठेवावी या प्रमुख मागणीसह असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना अपेक्षित असलेल्या इतर बदलांबाबत वित्तमंत्र्यांशी चर्चा केली.
बैठकीस वस्तू आणि सेवा कर आयुक्त राजीव जलोटा यांच्यासह हॉटेल ॲण्ड रेस्टॉरंट असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यात वस्तू आणि सेवा कर प्रणालीची अंमलबजावणी करताना शासनाने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली असल्याचे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले, हॉटेल आणि रेस्टॉरंटवरील कर दर कमी झाल्याची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात यावी. जे हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिक वस्तू आणि सेवा कर प्रणालीअंतर्गत रजिस्टर नाहीत त्यांना नोंदणीकृत करण्यासाठी असोसिएशनने पुढाकार घ्यावा यासाठी चर्चासत्रे, मेळावे घेण्यात यावेत. ज्या हॉटेल व्यावसायिकांनी वस्तू आणि सेवा कर प्रणालीअंतर्गत नोंदणी केली आहे त्यांनी त्यांचा जीएसटी नंबर हॉटेलमध्ये दर्शनी भागावर डिस्प्ले करावा. तशी कायद्यात तरतूद आहे असेही ते म्हणाले.
वस्तू आणि सेवा कर प्रणालीचे करजाळे वाढवताना जे छोटे व्यावसायिक कर जाळ्यात येऊ इच्छितात त्यांना त्यांचे परतावा दाखल करण्यासाठी वस्तू आणि सेवा कर विभाग मदत करील तसेच त्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण ही देईल, अशी माहिती वस्तू आणि सेवा कर आयुक्त राजीव जलोटा यांनी यावेळी दिली.
हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांना कमी करदराचा लाभ देताना इनपूट टॅक्स क्रेडिट सिस्टीम पूर्ववत ठेवावी या प्रमुख मागणीसह असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना अपेक्षित असलेल्या इतर बदलांबाबत वित्तमंत्र्यांशी चर्चा केली.
बैठकीस वस्तू आणि सेवा कर आयुक्त राजीव जलोटा यांच्यासह हॉटेल ॲण्ड रेस्टॉरंट असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"सामना "मधुन शिवसेने ने केले खडसेंचे समर्थन
शिवसेने ने आपले मुखपत्र असलेल्या सामना या दैनिकामधुन माजी महसुल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर होणाऱ्या आरोपांचे खंडण करत भाजपावर निशाणा साधला आहे .
भाजपा ने खडसे यांचे दाऊद सोबत संबंध जोडुन खडसे यांच्या देशभक्तीवर गंभीर आरोप केले आहेत .
एकीकडे सेना भाजपा यांच्यात राज्यात भांडणे सुरु असतांना दुसरीकडे आ.खडसे यांचे समर्थन केल्यामुळे राज्यभरातील राजकारणात बदल होण्याचे संकेत मिळत आहेत का अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.
भाजपा ने खडसे यांचे दाऊद सोबत संबंध जोडुन खडसे यांच्या देशभक्तीवर गंभीर आरोप केले आहेत .
एकीकडे सेना भाजपा यांच्यात राज्यात भांडणे सुरु असतांना दुसरीकडे आ.खडसे यांचे समर्थन केल्यामुळे राज्यभरातील राजकारणात बदल होण्याचे संकेत मिळत आहेत का अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.
मुलांनी आयुष्यभर आपल्यातली निरागसता जोपासावी –ना. विनोद तावडे
प्रतिनीधी, मुंबई
मुंबई, दि. 14 : दैनंदिन जीवनाच्या ताण-तणावापासून दूर जाण्यासाठी, मनावरील नैराश्याची जळमटं दूर करण्यासाठी लहान मुलांमध्ये मिसळले पाहिजे. निरागसता हा लहान मुलांचा विशेष गुण आहे. भावी आयुष्य निकोपपणे घालवण्यासाठी मुलांनी आयुष्यभर ही निरागसता जोपासली पाहिजे, असे मत शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज येथे व्यक्त केले.
बालदिनाच्या औचित्याने महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन मंडळच्यावतीने आयोजित कार्यक्रमात श्री.तावडे बोलत होते. यावेळी बालभवनच्या संकेतस्थळाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी नामवंत बाल साहित्य लेखिका डॉ. विजया वाड, बालभवनचे संचालक राजेंद्र अहिरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
बालभवनच्या सभागृहात जमलेल्या शालेय विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या विविध छायाचित्रांची पाहणी श्री.तावडे यांनी करुन विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या. त्यांनी रेखाटलेल्या चित्रांची माहिती घेतली. छायाचित्र कलेमध्ये सफाईदारपणा आणि सर्जनशीलता येण्यासाठी वेगवेगळी रंगसंगती वापरण्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधताना श्री.तावडे म्हणाले, बालभवनच्या परिसरात आज या लहान मुलांची चित्रकला बघताना मला लहानपणीचे दिवस आठवले. विद्यार्थ्यांनी रेखाटलेली वेगवेगळी छायाचित्रे त्यांच्यातील सूप्त कलागुणांचे दर्शन घडवणारी आहेत. लहानपणी आपल्याला गणित हा विषय अजिबात आवडायचा नाही, परंतु ज्यावेळी शिक्षकांनी गणिताशी संवाद साधायला शिकवलं त्यावेळी या विषयात मला रुची यायला लागली. तेव्हा तुम्हीसुद्धा अभ्यास करताना विषयाशी एकरूप होऊन पुस्तकांशी संवाद साधायला शिका. अभ्यास हा कंटाळवाणा न होता ती एक आनंददायी प्रक्रिया बनून जाईल. पाठ्यक्रमातील पुस्तकांव्यतिरिक्त अवांतर वाचन वाढवून आपला व्यक्तिमत्व विकास घडवून आणण्याचा सल्ला देखील श्री. तावडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला
मुंबई, दि. 14 : दैनंदिन जीवनाच्या ताण-तणावापासून दूर जाण्यासाठी, मनावरील नैराश्याची जळमटं दूर करण्यासाठी लहान मुलांमध्ये मिसळले पाहिजे. निरागसता हा लहान मुलांचा विशेष गुण आहे. भावी आयुष्य निकोपपणे घालवण्यासाठी मुलांनी आयुष्यभर ही निरागसता जोपासली पाहिजे, असे मत शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज येथे व्यक्त केले.
बालदिनाच्या औचित्याने महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन मंडळच्यावतीने आयोजित कार्यक्रमात श्री.तावडे बोलत होते. यावेळी बालभवनच्या संकेतस्थळाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी नामवंत बाल साहित्य लेखिका डॉ. विजया वाड, बालभवनचे संचालक राजेंद्र अहिरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
बालभवनच्या सभागृहात जमलेल्या शालेय विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या विविध छायाचित्रांची पाहणी श्री.तावडे यांनी करुन विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या. त्यांनी रेखाटलेल्या चित्रांची माहिती घेतली. छायाचित्र कलेमध्ये सफाईदारपणा आणि सर्जनशीलता येण्यासाठी वेगवेगळी रंगसंगती वापरण्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधताना श्री.तावडे म्हणाले, बालभवनच्या परिसरात आज या लहान मुलांची चित्रकला बघताना मला लहानपणीचे दिवस आठवले. विद्यार्थ्यांनी रेखाटलेली वेगवेगळी छायाचित्रे त्यांच्यातील सूप्त कलागुणांचे दर्शन घडवणारी आहेत. लहानपणी आपल्याला गणित हा विषय अजिबात आवडायचा नाही, परंतु ज्यावेळी शिक्षकांनी गणिताशी संवाद साधायला शिकवलं त्यावेळी या विषयात मला रुची यायला लागली. तेव्हा तुम्हीसुद्धा अभ्यास करताना विषयाशी एकरूप होऊन पुस्तकांशी संवाद साधायला शिका. अभ्यास हा कंटाळवाणा न होता ती एक आनंददायी प्रक्रिया बनून जाईल. पाठ्यक्रमातील पुस्तकांव्यतिरिक्त अवांतर वाचन वाढवून आपला व्यक्तिमत्व विकास घडवून आणण्याचा सल्ला देखील श्री. तावडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला
Monday, November 13, 2017
ना. गिरीष महाजन यांची जळगाव मनपा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर नाराजी...
आरोग्याच्या प्रश्नांबाबत महाजन यांची मनपा मध्ये तातडीची बैठक..
जळगाव शहरात दोन महिन्यांपासून डेंग्यू, मलेरिया, चिकुन गुनिया आदी साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. या आजारात सहा जणांच्या मृत्यूची माध्यमात चर्चा झाली आहे. या पार्श्वभूमिवर वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. गिरीषभाऊ महाजन यांनी आज सायंकाळी उशीरा मनपात पदाधिकारी, अधिकारी व प्रमुखांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत मनपाच्या नाकर्तेपणावर ना. महाजन यांनी तीव्र नाराजी व्यक्त करुन अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वच्छता वाढवून साथ रोग नियंत्रणासाठी तंबी दिली. यावेळी महापौर ललित कोल्हे, आमदार राजूमामा भोळे, चंदूलाल पटेल, प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर व इतर नगरसेवकांसह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
उपस्थित सर्व नगरसेवकांनी तक्रारी केल्या की, मनपात मनुष्यबळ व यंत्रणा पुरेशी आहे पण अधिकारी वर्ग काम करीत नाही.मच्छर, डिस निर्मूलनासाठी यंत्रे वापरात नाही. वॉर्डातील स्वच्छतेकडे लक्ष दिले जात नाही. आमदार भोळे यांनी थेट अधिकाऱ्यांवर रोष व्यक्त केला. सर्व बाजू ऐकून ना. महाजन यांनी सर्वांना झापून काढले. ते म्हणाले, संपूर्ण शहर साथरोगांनी तस्त आहे. प्रत्येक घरात रुग्ण आहे. तरी पण मनपाच्या दप्तरी केवळ ११५ संशयित रुग्णाची पालिकेत नोंद आहे. हेच तर नाकर्तेपणाचे लक्षण आहे. ना. महाजन यांनी धुरळणी यंत्राच्या वापराविषयी विचारल्यार अधिकाऱ्यांनी मान्य केले की, सर्व यंत्रे बंद आहेत. याचे कारण पालिकेने काही वर्षा पासून जंतूनाशकच विकत घेतलेले नाही.
घंटागाड्यांचा विषय आल्यानंतर अनेक वॉर्डात कचरा गोळा करायला घंटागाड्याच येत नाही असे नगरसेवक म्हणाले. याची कारणे अधिकाऱ्यांना विचारली असता, किरकोळ व फालतू कारणे दाखवून घंटा गाड्या जात नाही, असे सांगण्यात आले. मनपाचे कनिष्ट अधिकारी सहकार्य करीत नाहीत असे नगरसेवक म्हणाले.
आपल्या वॉर्डात घंटागाड्या वेळेवर येतील याकडे लक्ष द्या अशी सूचना ना. महाजन यांनी नगरसेवकांना केली. मनपाच्या स्वच्छता विभागात पुरेसे कर्मचारी व यंत्रणा आहे. त्याचा योग्य पध्दतीने वापर करा, असे ना. महाजन म्हणाले.
स्वच्छतेसाठी मनपाला एक महिना मोफत जेसीबी देवू असे आ. भोळे म्हणाले.शहरात साथीचे रुग्ण जास्त आहेत हे लक्षात घेवून कारवाई करा. स्वच्छता मोहीम राबवा, अशीही सूचना त्यांनी केली. नागरिकांना ओला व सुका कचरा स्वतंत्र टाकायला लावा. कचरापेटीची सवय लावा असेही ना. महाजन म्हणाले.
धुरळणी करणाऱ्यां सोनवणेंचे कौतुक
जळगाव शहरातगेले दोन महिने माजी नगरसेवक कैलास सोनवणे हे स्वखर्चाने धुरळणी करुन मच्छर, डास निर्मूलन करीत असल्या बद्दल त्यांचे कौतुक ना. महाजन यांनी केले. नगरसेवक व स्थायी समिती सदस्य अमर जैन, सुनील महाजन व स्वखर्चाने धुरळणी करीत असलेल्या नगरसेवकांचा. उल्लेख करण्यात आला.
उध्दव पुन्हा गरजले "मी सरकारवर नाराज"
‘होय, मी सरकारवर नाराज आहे, असे जाहीर सभेत बोलतो. कोपऱ्यात जाऊन कशाला बोलु ,अशी खोचक टिप्पणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या कथित गौप्यस्फोटावर केली. पवार हे पंतप्रधानांचे गुरू असल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला. आमदार जाधवांना सबुरीचा सल्ला देत, ‘चांगले काम करा शिवसेना निश्चित सोबत असेल, असे त्यांनी सांगितले
आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या मातुःश्री माजी आमदार तेजस्विनी जाधव यांनी लिहिलेल्या ‘रायभानजी जाधव ः व्यक्ती आणि विचार’ या पुस्तकाचे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ठाकरे यांनी, ‘शेतकरी कर्जमाफीची घोषणा झाली. ही योजना पूर्ण झाली पाहिजे. अटीच्या कर्जमाफीपेक्षा सपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे,’ अशी मागणी केली. गुजरातच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ‘जीएसटी’चे दर कमी केल्याचे त्यांनी सांगत, सिंचन, नोटाबंदीवर सडकून टीका केली.
आमदार जाधव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कवी ना. धों. महानोर यांनी स्व. रायभान जाधव यांच्यासोबत केलेल्या कार्याला उजाळा दिला. यावेळी मंत्री अर्जुन खोतकर, खासदार चंद्रकांत खैरे यांचीही भाषणे झाली.
सुमारे दोन तास चाललेल्या कार्यक्रमासाठी तालुकाभरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी बाबा वाघमारे, विनोद घोसाळकर, औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले, आमदार निलम गोऱ्हे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, प्रदीप जैस्वाल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, संजना जाधव, विकास जैन, आण्णासाहेब माने आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या मातुःश्री माजी आमदार तेजस्विनी जाधव यांनी लिहिलेल्या ‘रायभानजी जाधव ः व्यक्ती आणि विचार’ या पुस्तकाचे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ठाकरे यांनी, ‘शेतकरी कर्जमाफीची घोषणा झाली. ही योजना पूर्ण झाली पाहिजे. अटीच्या कर्जमाफीपेक्षा सपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे,’ अशी मागणी केली. गुजरातच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ‘जीएसटी’चे दर कमी केल्याचे त्यांनी सांगत, सिंचन, नोटाबंदीवर सडकून टीका केली.
आमदार जाधव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कवी ना. धों. महानोर यांनी स्व. रायभान जाधव यांच्यासोबत केलेल्या कार्याला उजाळा दिला. यावेळी मंत्री अर्जुन खोतकर, खासदार चंद्रकांत खैरे यांचीही भाषणे झाली.
सुमारे दोन तास चाललेल्या कार्यक्रमासाठी तालुकाभरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी बाबा वाघमारे, विनोद घोसाळकर, औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले, आमदार निलम गोऱ्हे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, प्रदीप जैस्वाल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, संजना जाधव, विकास जैन, आण्णासाहेब माने आदींची प्रमुख उपस्थिती होती.
Subscribe to:
Posts (Atom)









