Search This Blog

Tuesday, February 27, 2018

12 वी च्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार, निकाल लांबण्याची शक्यता....

   
प्रतिनिधी, औरंगाबाद 
            दि.२७/०२/२०१८

      राज्य़ात 12 वी ची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरु झाली आहे, मात्र यंदा 12 वीचा निकाल लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे, परिणामी विद्यार्थ्यांचंही मोठं नुकसान होणार आहे. 12 वी चे 4 पेपर्स आतापर्यंत झालेले आहेत, पण राज्यात एकाही विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका तपासण्यात आलेली नाही. कारण राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकलाय.      संपूर्ण राज्यात हे बहिष्कार आंदोलन सुरु झाल्यानं यंदाचा 12 वीचा निकाल वेळेत लागणार नाही, तर यामुळे विद्यार्थी आणि पालकही आता चिंतेत आहेत. राज्यातल्या अनुदानित आणि विनाअनुदानित अशा सर्व महाविद्यालयांमधील प्राध्यापक या आंदोलनात सहभागी झाले. कोल्हापूर विभागामध्ये 2200 प्राध्यापक तर राज्याभरातून 72 हजार प्राध्यापकांनी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकलाय.
कला , वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांमधल्या उत्तरपत्रिका आता तपासणीविना पडून आहेत, त्यामुळे आता अधिनेशनाच्या काळात तरी या शिक्षकांच्या मागण्या पूर्ण होणार का? हे पहावं लागणार आहे. या मागणीसह इतर काही मागण्या घेऊन हे शिक्षक आंदोलनात सहभागी झाले आहेत.
नाशिक अंतर्गत येणाऱ्या जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक या चार जिल्ह्यातील सुमारे एक लाख ६९ हजार विद्यार्थी १२वी ची परिक्षा देत आहे . औरंगाबाद अंतर्गत सुमारे १लाख ४५हजार विद्यार्थी तर पुणे मधुन २लाख१२हजार विद्यार्थी  परिक्षा देत आहेत.
 निकाल लांबणीवर पडला तर विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी ,वैद्यकीय प्रवेशास मुकावे लागेल हे निश्चित.

Friday, February 23, 2018

अस्मिता योजनेत मुलींना मिळणार ५ रुपयात ८ सॕनिटरी नॕपकीन

ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींना फक्त ५ रुपयांमध्ये ८ सॅनिटरी नॅपकीन देण्याची योजना ग्रामविकास विभागांतर्गत उमेद अभियानामार्फत राबविली जाणार आहे. या योजनेचा लोगो, योजनेच्या अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेले मोबाईल ॲप आणि डिजीटल अस्मिता कार्ड यांचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात करण्यात आले. येत्या महिला दिनापासून म्हणजे ८ मार्चपासून अस्मिता योजना सुरु होत आहे.
५० मुलींच्या सॅनिटरी नॅपकीनसाठी मुख्यमंत्र्यांची अस्मिता स्पॉन्सरशीप

यावेळी अस्मिता फंडाचाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.https://mahaasmita.mahaonline.gov.in/ या वेबपोर्टलद्वारे ग्रामीण भागातील मुली व महिलांना सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध होण्यासाठी लोक अस्मिता स्पॉन्सर (अस्मिता प्रायोजक) होऊ शकतील. या निधीतून ग्रामीण भागातील मुलींना सॅनिटरी नॅपकीन मिळण्यासाठी लोकसहभागातून मोठी मदत उपलब्ध होणार आहे. आज मुख्यमंत्र्यांनी अस्मिता फंडाचा शुभारंभ करताना ५० मुलींना १२ महिने सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करुन देण्यासाठी ऑनलाईन रक्कम वर्ग करुन या ५० मुलींची अस्मिता स्पॉन्सरशीप स्विकारली. अस्मिता स्पॉन्सरशीप स्विकारणारे मुख्यमंत्री श्री. फडणवीस हे पहिले ठरले. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी १५१ मुलींना १२ महिने सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करण्यासाठी ऑनलाईन रक्कम वर्ग करुन या १५१ मुलींची अस्मिता स्पॉन्सरशीप स्विकारली.


पहिल्या टप्प्यात ७ लाख मुलींना मिळणार अस्मिता कार्ड

अस्मिता योजनेतून जिल्हा परिषद शाळांमधील ११ ते १९ वयोगटातील किशोरवयीन मुलींना २४० मीमीच्या ८ पॅडचे एक पाकीट ५ रुपयांमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यासाठी किशोरवयीन मुलींची आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत नोंदणी करुन त्यांना अस्मिता कार्ड देण्यात येणार आहे. अस्मिता कार्डधारक किशोरवयीन मुलगी बचत गटांकडून सॅनिटरी नॅपकीन खरेदी करतील. पहिल्या टप्प्यात राज्यातील साधारण ७ लाख मुलींना अस्मिता कार्ड देण्यात येणार आहेत. अस्मिता कार्डधारक किशोरवयीन मुलींना ५ रुपयांप्रमाणे विक्री केलेल्या पॅकेटच्या संख्येच्या प्रमाणात प्रती पॅकेट १५.२० रुपयांप्रमाणे अनुदान शासन बचतगटांना देणार आहे. किशोरवयीन मुलींना वर्षभरात १३ पाकीटे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.


आज शुभारंभ करण्यात आलेल्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून महिला बचतगट हे सॅनिटर नॅपकीनची मागणी ऑनलाईन नोंदवतील. नोंदवलेल्या मागणीनुसार वितरक त्यांना पुरवठा करतील. ॲप, अस्मिता कार्ड, वेबपोर्टल हे येस बँक, महाऑनलाईन व केपीएमजी यांच्या सहाय्याने तयार करण्यात आले.
महिलांनाही मिळणार माफक दरात सॅनिटरी पॅड

अस्मिता योजनेतून ग्रामीण भागातील महिलांनाही माफक दरात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. महिलांना २४० मीमीच्या ८ पॅडचे एक पाकीट २४ रुपयांना तर २८० मीमीच्या ८ पॅडचे एक पाकीट २९ रुपयांना उपलब्ध होणार आहे. बचतगट हे वितरकांकडून सॅनिटरी नॅपकीनचे पाकीट खरेदी करुन परस्पर विक्री करणार आहेत.

Thursday, February 22, 2018

हल्लाबोल करणाऱ्यांना मंत्री गिरिष महाजन यांचे चोख प्रत्युत्तर


पाटबंधारे प्रकल्पांवर तीनपट वाढीव तरतुद तापी पाटबंधारेसाठी ६९० कोटी १६० कोटींची तरतुद वितरीत
हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्त जळगाव जिल्ह्यात विरोधकांचे नेते येवून गेले. अमळनेर व जामनेर येथे घेतलेल्या सभांमध्ये सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे यांनी जलसंपदा विभागाच्या कामाविषयी बेछूट व बिनबुडाचे आरोप केले. अशा दिशाभूल करणाऱ्या आरोपांना वेळीच उत्तर देण्यासाठी हा खुलासा आवश्यक आहे, असे म्हणत राज्याचे जलसंपदामंत्री ना. गिरिष महाजन यांनी सविस्तर खुलासा केला आहे.

ना. महाजन म्हणतात, जलसंपदामंत्र्यांनी काय केले आणि प्रकल्पांना पुरेसा निधी नाही असा आरोप करणाऱ्यांनी काँग्रेस सोबत आघाडी सरकारमध्ये असणाऱ्यांनी काय केले ? याचे उत्तर द्यावे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणतात की त्यांनी अनेक सिंचन प्रकल्प सुरु केले. प्रकल्पांची घोषणा करणे आणि त्याचे काम सुरु होणे यात मूलभूत फरक आहे. काँग्रेस आघाडी सरकारने केवळ घोषणा केल्या पण निधी कुठे दिला ? उलट सिंचन कामांचे ठेके देताना घोटाळे झाल्याच्या तक्रारी होत्या. जलसंपदा मंत्री म्हणून मी काम सुरु केले तेव्हा प्रलंबित कामांच्या निविदा रद्द करुन नव्याने प्रक्रिया राबविली. यातून
रिटेंडरींग करताना जवळपास १००० कोटी रुपयांचा निधी वाचला होता.
ना. महाजन यांनी असेही म्हटले आहे की, तापी खोरे साठी ३०० कोटींची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे. मागील वर्षी तापी खोरेसाठी ३५० कोटींची तरतुद करण्यात आली होती. तथापी ती पुरेशी नसल्याने हिवाळी अधिवेशनात ना. गिरीषभाऊंनी तापी खोऱ्यासाठी आतिरिक्त ३०० कोटींची तरतूद मंजुर करुन घेतली. या आर्थिक वर्षात  तापी खोरे महामंडळाला एकूण ६९० कोटींची भरीव तरतुद मंजूर झाली आहे. यात हतनूरसाठी ५ कोटी, वाडी शेवाडीसाठी १५ कोटी, वरणगाव तलावसाठी ७ कोटी, कांगसाठी ८ कोटी, भागपूरसाठी २० कोटी, बोदवड उपसा सिंचनसाठी १५ कोटी, सुरवाडे सामफळ साठी २० कोटी, निम्न तापीसाठी ७५ कोटी, कुऱ्हा वडोदा उपसा सिंचनसाठी २५ कोटी,  शेळगाव बैरेजसाठी३५ कोटी, वरखेड लोंढेसाठी ६० कोटी, देहलीसाठी ७० कोटी,  कोरडीसाठी २१ कोटी, पुनंदसाठी १४ व भुसंपदनासाठी ४५ कोटी अशी भरीव आर्थिक तरतुद झाले सदरिल प्रकल्प मार्गी लागतील .तसेच तापी खोरे विकास महामंडळास मागिल वर्षी 750 आशिर्वाद भरिव तरतूद झाल्याने तापि प्रकल्प मार्गि लागनार आहे,ही माहिती नसलेले विरोधक केवळ टीकेसाठी टीका करीत आहेत.

ना. महाजन यांनी दावा केला आहे की, यापूर्वी एकचवादा अजितदादा अशा घोषणा देत सिंचन प्रकल्पांना निधी मिळवायचे प्रयत्न होता. पण राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खरोखर किती निधी दिला याची आकडेवारी जाहिर करावी. शिवाय, चितळे समितीने काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात सिंचन संशोधन अहवाल सादर केला होता. त्याच अहवालातील तरतुदीनुसार निधी वितरण करणे व खर्च करण्याची सक्ती संबंधित सरकारी यंत्रणेला केली आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेपासून तर आज पर्यंत सिंचन विभागाला एवढी घसघसित तरतुद कोणीही केलेली नाही.
ना. महाजन यांनी असेही म्हटले आहे की, सत्ता गमावल्याच्या दुःखातून अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस सावरलेली नाही. म्हणून माझ्यावर खोटे, बिनबुडाचे आरोप खा.सुप्रिया सुळे,  धनंजय मुंडे करीत आहेत. जामनेर तालुक्यातही आज सर्वाधिक शेततळी तयार झाली असून विविध सिंचन प्रकल्प मार्गी लागले आहे. विरोधक अस्वस्थ होवून आरोप करीत असून जनता मात्र त्यांनाच जाब विचारत आहे, तुम्ही काय केले होते. विरोधकांच्या आरोपांची गंभीरपणे कोणीही दखल घेत नाही अशीही पुष्टी ही त्यांनी जोडली.