Search This Blog

Monday, September 2, 2019

पहूर येथे वाघूर नदीत बैल जोडी वाहून जात असताना बैलांचा मृत्यू तर शेतकरी बचावला

प्रतिनिधी पहूर,
येथील शेतकरी रवींद्र तुळशीराम पाटील वय 30 हा आपल्या नेहमीप्रमाणे वाघूर नदीतून  काठावर असलेल्या शेतात बैलजोडी घेऊन जात असताना बैलगाडी सहित डोहात वाहून जात असताना काही नागरिकांनी वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यातील दोन्ही लोक हेसुद्धा दुखत असताना या तिघांना उपस्थित असलेल्या काही तरुणांनी वाचवले.
सविस्तर माहिती अशी की आज नऊ वाजता येथील शेतकरी रवींद्र तुळशीराम पाटील हे आपले नेहमीप्रमाणे वाघुर नदीच्या काठावर असलेल्या शेतात बैलगाडी घेऊन शेतात जात असताना वाघुर नदीच्या अर्थ भागी गाडी आली असता पाण्याच्या प्रभावाने बैलगाडी सहित शेतकरी रवींद्र तुळशीराम पाटील डोहा  कडे वाहून जात असताना तेथील काही नागरिकांनी आरडाओरड केल्याने तिथे उपस्थित असलेले पलेश देशमुख सागर जो माळकर या दोघांनी रवींद्र पाटील व बैलजोडीला वाचवण्याचा प्रयत्न केला असता हे दोघेही प्रवाहाच्या पाण्याने डुंबत  असताना तेथील नागरिकांनी आरडाओरड केल्याने गावातील विठ्ठल किसन पांढरे व त्याचा मुलगा शुभम पांढरे गोकुळ उत्तम देशमुख या तिघांनी सागर जो मालकर रवींद्र पाटील पलेश देशमुख तिघांना वाचवले पण वाचवले असता बैल जोडी हे जागीच मृत्युमुखी पडली या तिघांना पहूर  ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता प्राथमिक उपचार करून सागर जो मालकर व परेश देशमुख यांना पुढील उपचारार्थ जळगाव सरकारी दवाखाना चालवले आहे तर शेतकरी रवींद्र पाटील येथील खाजगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले आहे या तिघांची परिस्थिती चांगली असल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला गणेश चतुर्थीच्या दिवशी या घटनेमुळे सणावर विरहं पडण्याची शक्यता होती शेतकरी रवींद्र पाटील व त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणारे या दोघींना प्राण वाचवणारे विठ्ठल पांढरे गोकुळ देशमुख शुभम पांढरे यांचे गावकऱ्यांनी कौतुक केले आहे

No comments:

Post a Comment