भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा भाजपला घरचा आहेर दिला आहे. खडसेंनी आरोग्य विभागाच्या पुरवण्या मागण्यांवरील चर्चेदरम्यान सरकारला फटकारले.
"सिव्हिल हॉस्पिटल वैद्यकीय शिक्षणाकडे ट्रान्सफर केलं असं सांगतात, आता आम्हाला पण कुठेतरी ट्रान्सफर करा म्हणजे झालं. असे खडसे म्हणाले"
जळगाव जिल्हा ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने जनता त्रस्त आहे.एमबीबीएस नसतील, तर बीएएमस डॉक्टर्स द्या, अशी मागणी खडसेंनी केली. नातेवाईक जेव्हा एखाद्याचा मृतदेह आमदारांच्या दारावर आणून ठेवतात, तेव्हा आम्ही काय करायचं? असा प्रश खडसेंनी उपस्थित केला करुन आरोग्य मंत्र्यांना त्या विषयी जाब विचारला. खडसेंनी म्हटले जेव्हा, आरोग्य मंत्र्यांशी फोनवर चर्चा केली, तर डॉक्टर पाठवतो म्हणतात, त्याला लागतात चार तास. तोपर्यंत १० जणांचे १०० होतात. हातात दगड घेऊन असतात, आम्ही काय करायचे ? असा प्रश्न खडसेंनी सभागृहात उपस्थित करुन मला पण ट्रान्सफर करा.. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी मंगळवारी आरोग्य विभागाच्या चर्चेत बोलताना त्यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यावरही अप्रत्यक्ष टीकास्त्र सोडले. व्हेंटिलेटर सारख्या सुविधा मिळत नसल्यावरून बोलताना त्यांनी ‘केवळ लाखो लोकांच्या आरोग्याची शिबिरे घेऊन चालणार नाही तर ग्रामीण भागातल्या लोकांना चांगल्या सुविधा हि द्याव्या लागतील’, असे म्हणत त्यांनी महाजन यांना टोमणा मारला. तसेच मुक्ताईनगरात वैद्यकीय अधिकारी नाहीत जळगाव आणि मुक्ताईनगर इथे प्राथमिक आरोग्य केंद्रात गेली अनेक वर्ष वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. यासंदर्भात आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्यासोबत अनेक बैठक झाल्या. फोन वरही त्यांच्यासोबत चर्चा झाली त्यांनी सकारात्मक आश्वासन अनेक वेळा दिले पण रिक्त पदे भरली गेली नाहीत.
सरकारवर टीका करायची म्हणून बोलत नाही
राज्यात आरोग्य सेवांचा बोजवारा उडालेला आहे. गेल्या आठवड्यात मुक्ताईनगरच्या रुग्णाला जेजे रुग्णालयात ऍडमिट करून घेण्यात आले नाही. हॉस्पिटल्स मध्ये व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याचे कारण देण्यात आले. मात्र काही वेळातच त्या महिलेचा मृत्यू झाला, याला जबाबदार कोण? असा सवाल करत त्यांनी आरोग्यमंत्र्यांनी लक्ष्य केले. सरकारवर टीका करायची म्हणून मी बोलत नाही तर सामान्य माणसांच्या प्रश्नावर मी बोलत असल्याचेच त्यांनी सांगितले. केवळ आरोग्याचं नाही तर आदिवासीच्या मुद्यावरही त्यांनी सरकारला घेरले . आमदार आदिवासी भागात काही कामे करतो ,पण त्यांनाही जीएसटीला तोंड द्यावे लागत आहे . त्याचबरोबर पेसा कायद्याची योग्य अंमलबजावणी व्हावी असेही त्यांनी म्हटले. त्याचबरोबर आदिवासी आरक्षणाला धक्का न लावता कोळी समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश करावा अशी मागणी ही त्यांनी यावेळी खडसे यांनी केली.
"सिव्हिल हॉस्पिटल वैद्यकीय शिक्षणाकडे ट्रान्सफर केलं असं सांगतात, आता आम्हाला पण कुठेतरी ट्रान्सफर करा म्हणजे झालं. असे खडसे म्हणाले"
जळगाव जिल्हा ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने जनता त्रस्त आहे.एमबीबीएस नसतील, तर बीएएमस डॉक्टर्स द्या, अशी मागणी खडसेंनी केली. नातेवाईक जेव्हा एखाद्याचा मृतदेह आमदारांच्या दारावर आणून ठेवतात, तेव्हा आम्ही काय करायचं? असा प्रश खडसेंनी उपस्थित केला करुन आरोग्य मंत्र्यांना त्या विषयी जाब विचारला. खडसेंनी म्हटले जेव्हा, आरोग्य मंत्र्यांशी फोनवर चर्चा केली, तर डॉक्टर पाठवतो म्हणतात, त्याला लागतात चार तास. तोपर्यंत १० जणांचे १०० होतात. हातात दगड घेऊन असतात, आम्ही काय करायचे ? असा प्रश्न खडसेंनी सभागृहात उपस्थित करुन मला पण ट्रान्सफर करा.. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी मंगळवारी आरोग्य विभागाच्या चर्चेत बोलताना त्यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यावरही अप्रत्यक्ष टीकास्त्र सोडले. व्हेंटिलेटर सारख्या सुविधा मिळत नसल्यावरून बोलताना त्यांनी ‘केवळ लाखो लोकांच्या आरोग्याची शिबिरे घेऊन चालणार नाही तर ग्रामीण भागातल्या लोकांना चांगल्या सुविधा हि द्याव्या लागतील’, असे म्हणत त्यांनी महाजन यांना टोमणा मारला. तसेच मुक्ताईनगरात वैद्यकीय अधिकारी नाहीत जळगाव आणि मुक्ताईनगर इथे प्राथमिक आरोग्य केंद्रात गेली अनेक वर्ष वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. यासंदर्भात आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्यासोबत अनेक बैठक झाल्या. फोन वरही त्यांच्यासोबत चर्चा झाली त्यांनी सकारात्मक आश्वासन अनेक वेळा दिले पण रिक्त पदे भरली गेली नाहीत.
सरकारवर टीका करायची म्हणून बोलत नाही
राज्यात आरोग्य सेवांचा बोजवारा उडालेला आहे. गेल्या आठवड्यात मुक्ताईनगरच्या रुग्णाला जेजे रुग्णालयात ऍडमिट करून घेण्यात आले नाही. हॉस्पिटल्स मध्ये व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याचे कारण देण्यात आले. मात्र काही वेळातच त्या महिलेचा मृत्यू झाला, याला जबाबदार कोण? असा सवाल करत त्यांनी आरोग्यमंत्र्यांनी लक्ष्य केले. सरकारवर टीका करायची म्हणून मी बोलत नाही तर सामान्य माणसांच्या प्रश्नावर मी बोलत असल्याचेच त्यांनी सांगितले. केवळ आरोग्याचं नाही तर आदिवासीच्या मुद्यावरही त्यांनी सरकारला घेरले . आमदार आदिवासी भागात काही कामे करतो ,पण त्यांनाही जीएसटीला तोंड द्यावे लागत आहे . त्याचबरोबर पेसा कायद्याची योग्य अंमलबजावणी व्हावी असेही त्यांनी म्हटले. त्याचबरोबर आदिवासी आरक्षणाला धक्का न लावता कोळी समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश करावा अशी मागणी ही त्यांनी यावेळी खडसे यांनी केली.