महाराष्ट्र राज्यात जवळपास १७ लाख मोतीबिंदू आजाराचे रुग्ण असुन या आजारामुळे डोळ्यांना अंधत्व येते. वयाच्या ४५ वर्षानंतर मोतिबिंदूचा त्रास असलेल्या रुग्णांची संख्या लक्षणिय आहे. त्यामुळे महाराष्ट्र हा मोतिबिंदूमुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्याच्या नियोजनाची जबाबदारी वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा राज्यभरात आरोग्य महा शिबिरे घेणारे ना. गिरीषभाऊ महाजन यांच्यावर सोपविली आहे.
ना. गिरीषभाऊंनी नेत्रविशारद डॉ. तात्याराव लहाने व डॉ. रागिनी पारेख यांच्या नेतृत्वात काम सुरु केले आहे. या दोघांच्या मार्गदर्शनात राज्यभरात ठिकठिकाणी नेत्र शस्त्रक्रिया होत आहेत. मोतिबिंदू मुक्त अभियानाचा पहिला टप्पा जळगाव येथून सुरु होत आहे. या अभियानांतर्गंत जळगाव येथे २,००० रुग्णांचे अॉपरेशन केले जाणार आहे. या सर्व शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,{जळगाव जिल्हा रुग्णालयात} दि. २३ नोव्हेंबरला मोतिबिंदू शस्त्रक्रिया करिता तपासनि शिबिर होणार आहे. या साठी सर्व मोतिबिंदू रुग्णांची तपासनि दि.23 रोजी व शस्रक्रिया दि. २४ व २५ नोव्हेंबरला दि. २६ नोव्हेंबरला रुग्नाची पुन्हा भर्ति होतील. दि. २७ व २८ ला शस्रक्रिया दि. २९ ला रुग्नाची भर्ति व दि.30 व 1 डिसेबर शस्त्रक्रिया होतील.दि.2 डिसेबर सुट्टी या अभियानात अॉपरेशन झालेल्या सर्व रुग्णांची पुन्हा तपासणी दि. ८ डिसेंबरला होईल.
सर्व शस्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे होनार आहे
No comments:
Post a Comment