Search This Blog

Wednesday, November 15, 2017

कर्ज न दिल्यास बँकेवर कारवाई करणार - मधुकर जाधव



रिझर्व बँक मुंबई विभाग यांचा तर्फे उद्योजक आणि बँकर्स यांच्या एकत्रितरित्या जिल्हा नियोजन भवनात टाऊन हॉल मीटिंग आयोजित करण्यात आली होती बँक आपल्या ग्राहकांना कर्ज देत नाही त्रास देतात उद्धट बोलतात फिरवाफिरव करतात शासन अनुदान असलेल्या उद्योगांना बँक कर्ज देत नाही अशा अनेक तक्रारींचा पाढा उद्योजकानी टाऊन हॉल मीटिंग मध्ये वाचला .त्यावेळी कर्ज न देणारया बँकांवर कारवाही करण्याचा इशारा रिझर्व बँक ऑफ इंडिया चे नाशिक विभागाचे रिजनल मॅनेजर मधुकर जाधव यांनी दिला आहे . जीडीपी वाढवण्यासाठी सरकार नेहमी बँकांवर ताण  देत असते  बँकांकडे मोठ्या प्रमाणावर पैसा आहे मात्र स्लो डाऊन झाल्याने बँकांवर ताण वाढला आहे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांचा देशाच्या एकूण निर्यातीमध्ये ४०% वाट आहे या उद्योगांच्या प्रगती नंतरच अर्थव्यवसतेत सुधारणा होईल .असे प्रतिपादन जाधव यांनी केले .


No comments:

Post a Comment