Search This Blog

Sunday, August 11, 2019

लाखांहून अधिक व्यक्ती, 36 हजारहून अधिक जनावरांचे पुनर्वसन जिल्हाअधिकारी डॉ आभिजीत चौधरी

सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. दि.11 ऑगस्ट रोजी सकाळी 11वाजेपर्यंत जिल्ह्यातील एकूण 104पूरबाधित गावातील सुमारे 29 हजार706 कुटुंबांतील 1 लाख, 58 हजार970 लोक व 36 हजार 54 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहेअशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

डॉ. चौधरी म्हणालेमिरज तालुक्यातील 20 गावातील 4 हजार968 कुटुंबांतील 25 हजार 375लोक व 6 हजार 334 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. पलूस तालुक्यातील 25 गावातील 7 हजार461 कुटुंबांतील 36 हजार 636लोक व 11 हजार 251 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. वाळवा तालुक्यातील 37 गावांतील 12हजार 256 कुटुंबांतील 65 हजार547 लोक व 15 हजार 135जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. शिराळा तालुक्यातील 21 गावातील605 कुटुंबांतील 2 हजार 941 लोक व 2 हजार 726 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे.

महानगरपालिका क्षेत्रातील 4 हजार416 कुटुंबांतील 28 हजार 471लोक व 608 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. 

मिरज तालुक्यातील 12, वाळवा तालुक्यातील 3, शिराळा तालुक्यातील 21 तसेच पलूस तालुक्यातील 25 आणि महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग यांचा पूर्णतः संपर्क तुटला आहे. त्यापैकी वाळवाशिराळापलूस तालुक्यात स्थलांतर करण्याचे काम पूर्ण झाले आहे. तर मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज व हरिपूर येथे स्थलांतरणाचे काम सुरू आहे.

No comments:

Post a Comment