Search This Blog

Wednesday, August 28, 2019

आश्रमशाळेतील मुलांना मिळणार इंग्रजीतून धडे -डॉ अशोक उईके आदिवासी विकास मंत्री

प्रतिनिधी मुंबई
 आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेता यावे यासाठी शासकीय आश्रमशाळांचे रूपांतर इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमात करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. उईके म्हणालेपहिल्या टप्प्यात 50  शासकीय आश्रमशाळांमध्ये पहिली इयत्तेपासून इंग्रजी आणि सहावी इयत्तेपासून सेमी इंग्रजी माध्यमात शिक्षणाचे धडे गिरवले जाणार असून इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. ग्रामीण भागात असणाऱ्या शासकीय आश्रमशाळांमध्ये इंग्रजी माध्यमातील शिक्षण उपलब्ध होणार असल्याने आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा मार्ग सोपा होणार आहे.

महाराष्ट्रातील दुर्गम भागात आदिवासींच्या प्रगतीसाठी आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत 502 शासकीय आश्रमशाळा सुरु आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमानुसार या आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना मराठी माध्यमातून शिक्षण देण्यात येते. इंग्रजी माध्यमात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना खासगी नामांकित शाळांमध्ये प्रवेश घ्यावा लागतो. या शाळेत विद्यार्थ्यांना पहिली ते बारावी शिक्षण मोफत देण्यात येते. या योजनेअंतर्गत 179 शाळांमध्ये 54 हजार विद्यार्थी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत आहेत.

गेल्या काही वर्षात आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्यासाठी आदिवासी पालकांचा कल वाढला आहे. यासाठी विभागामार्फत सुरु असलेल्या शासकीय आश्रमशाळेतच आदिवासी विद्यार्थ्यांची इंग्रजी माध्यमातील शिक्षणाची सोय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन आयएसओ मानांकन मिळालेल्या किंवा इतर चांगल्या शासकीय आश्रमशाळांचे रुपांतर इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमात करण्यात येणार आहे. यासाठी सदर आश्रमशाळेत करडी पथ उपक्रम सुरु करण्यात आलेला आहे. त्याशिवाय शाळा इमारत,वसतिगृहवीजदळणवळण,ग्रंथालयप्रयोगशाळासंगणक कक्ष,क्रीडांगण अशा मुलभूत सुविधा असलेल्या आश्रमशाळा इंग्रजी माध्यमासाठी निवड करण्याचे प्रस्तावित आहे. यानुसार 2019-20 या वर्षात शासकीय आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना पहिली इयत्तेपासून इंग्रजी माध्यमात प्रवेश घेता येणार आहे. तसेच इयत्ता सहावीपासून गणित आणि विज्ञान विषय मराठी व इंग्रजी या दोन्ही माध्यमातून शिकता येणार आहेत. यात ठाणे जिल्ह्यात 7नाशिक जिल्ह्यात 26अमरावती जिल्ह्यात 13नागपूर जिल्ह्यात 13 आश्रमशाळेत इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमातील शिक्षण सुरु करण्यात येणार आहे.

या शाळेमध्ये इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेले व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेले पदवीधारक उमेदवार यांची शिक्षक म्हणून गुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या नामवंत शिक्षण संस्थांबरोबर सामंजस्य करार करून गुणवत्ता धारक शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञ यांचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे.

शासकीय आश्रमशाळेचे इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमात रूपांतर करण्यात येत असल्याने भविष्यात उच्च शिक्षणासाठी आदिवासी विद्यार्थी मागे राहणार नाहीत. तसेच आदिवासी विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी,तंत्रशिक्षणवैद्यकीय शिक्षण घेणे सोपे होणार आहे. यामुळे शिक्षणाच्या वाढत्या स्पर्धेत ते स्वतःला सिद्ध करू शकतील असे डॉ. उईके यांनी सांगितले.

एकलव्य निवासी शाळांमध्ये पहिलीपासूनच सीबीएसई अभ्यासक्रम
                                                           महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक सोसायटी नाशिक अंतर्गत सुरु असलेल्या एकलव्य निवासी शाळांमध्ये पहिली ते पाचवी इयत्तेपासूनच सीबीएसई अभ्यासक्रम सुरु करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

डॉ. उईके म्हणालेसध्या सहावी इयत्तेपासून सुरु असलेला सीबीएसई अभ्यासक्रम पहिली इयत्तेतच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार असल्याने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमातील अभ्यासक्रमाचे आकलन सोपे होणार आहे. सन 2019-20 या वर्षात पहिल्या टप्प्यात 16 व त्यानंतर उर्वरित एकलव्य निवासी शाळांमध्ये पहिलीपासून वर्ग सुरु करण्यात येणार असल्याने प्रत्येक वर्षी दोन हजार विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमात प्रवेश देणे शक्य होणार आहे. पहिली इयत्तेपासूनच आदिवासी विद्यार्थ्यांना सीबीएसई अभ्यासक्रमाचा लाभ घेता येणार असल्याने या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या वाटा अधिक सुकर होणार आहेत. शिक्षणाचा दर्जा उत्तम राखण्यासाठी या शाळेतील शिक्षक भरती प्रक्रिया काटेकोर होण्यासाठी नामवंत शिक्षण संस्थांबरोबर सामंजस्य करार करण्यात येणार आहे.

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी केंद्र शासनाने नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राज्य स्तरावर एकलव्य निवासी शाळा सुरु केल्या. 2001 ते 2019 पर्यंत 25 एकलव्य निवासी शाळा सुरु असून  इयत्ता सहावी ते बारावी पर्यंत केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) या अभ्यासक्रमाचे इंग्रजी माध्यमातून मोफत शिक्षण देण्यात येते. यात विद्यार्थ्यांना भोजन,निवास व्यवस्थाअंथरूणवह्या पुस्तकेगणवेशलेखन साहित्य शासनामार्फत मोफत पुरवण्यात येतात. नाशिकनागपूरअमरावती,पालघरगडचिरोलीनंदुरबार,गोंदियाधुळेनांदेडठाणेचंद्रपूर,यवतमाळअहमदनगर या जिल्ह्यात एकलव्य निवासी शाळा सुरु आहेत. इंग्रजी माध्यमातून शिक्षणाचा कल असलेले अनेक विद्यार्थी इयत्ता सहावीपासून एकलव्य निवासी शाळेत प्रवेश घेतात. मात्र पहिलीपासून मराठी माध्यमात शिक्षण झाल्यावर या विद्यार्थ्यांना एकलव्य निवासी शाळेत सीबीसीई अभ्यासक्रमासाठी थेट प्रवेश देण्यात येत असल्याने त्यांना भाषेची अडचण येते. आदिवासी विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा पाया भक्कम व्हावा आणि या विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषेची अडचण दूर व्हावी या उद्देशाने एकलव्य निवासी शाळेत पहिलीपासूनच सीबीएसई अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागातर्फे घेण्यात आला आहे. दुर्गम भागात असणाऱ्या या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेले चांगल्या दर्जाचे शिक्षक उपलब्ध होण्यासाठी राज्यराष्ट्रीय स्तरावरील वृत्तपत्रे,विविध संकेतस्थळेनामवंत राष्ट्रीय संस्थाविद्यापीठे येथे शिक्षक भरतीविषयी जाहिरात प्रसिद्धी करण्यात येणार आहे. इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेल्या गुणवत्ताधारक  उमेदवारांची पारदर्शकपणे शिक्षक म्हणून निवड करण्यात येणार आहे. इयत्ता पहिलीपासून उत्तम दर्जाचे इंग्रजी माध्यमातील शिक्षण आदिवासी विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार असल्याने आदिवासी विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीतंत्रशिक्षणवैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेणे अधिक सोपे होणार आहे.

No comments:

Post a Comment